
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २६ जानेवारी (वार्ता.) – मराठी भाषा विश्व, पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन विविध ठिकाणी आयोजित केले जाते. २६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी भगूर (जिल्हा नाशिक) येथे हा पुरस्कार अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना घोषित झाला होता. काही अपरिहार्य कारणास्तव अधिवक्त्या (सौ.) भारती जैन तेथे उपस्थित राहू शकल्या नाहीत. डॉ. ए.बी. पाटील यांनी विशेष वेळ काढून सौ. जैन यांना हा पुरस्कार आणि मानपत्र प्रदान केले.
प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांचे आतापर्यंत २४ हून अधिक चरित्रात्मक ग्रंथ प्रकाशित झाले असून ते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, मुंबईचे सदस्य आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी आहेत. त्यांनी अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांचे हिंदुत्व आणि सामाजिक कार्य यांचे कौतुक करून मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
सर्वांशी जवळीक साधणारे, ईश्वराप्रती भाव असणारे आणि सर्वांना समवेत घेऊन जाणारे समष्टी व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (वय ४७ वर्षे) !
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्याच्या प्रसंगी कोल्हापूर येथील श्री. बाबासाहेब भोपळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
यापुढे विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार नाही !