
मुंबई – ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेचीच जागा योग्य आहे. पण या प्रकरणी अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल होत आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याविषयी एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘मेट्रो ३’च्या कारशेडची जागा पालटण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला आहे. त्यासाठी अहवाल सिद्ध करून नवीन समितीचा निवळ फार्स करण्यात येत आहे. यातून मेट्रो प्रकल्प रखडेल आणि राज्याचीही मोठी आर्थिक हानी होईल. खासगी विकासकांना मोठे आर्थिक लाभ देण्यासाठी सुद्धा हालचाली होत आहेत. हा प्रकार उघडकीस येईल, तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, अशी चेतावणी फडणवीस यांनी या पत्रात दिली आहे.
कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल, असे फडणवीस यांनी यात नमूद केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !