शेतकर्यांसह सर्व जनता सुखी होण्यासाठी आदर्श राज्य हवे !

अमरावती, २५ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या धनेगावातील अशोक भुयार (वय ५० वर्षे) या संत्रा उत्पादक शेतकर्याने व्यापार्याकडून फसवणूक झाल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्याने त्याला मद्य पाजून मारहाण केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी शेतकरी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार आणि बीट जमादार यांनीही या शेतकर्याला मारहाण केली असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे ही चिठ्ठी लिहून त्याने न्यायाची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधित ठाणेदार आणि बीट जमादार यांच्या स्थानांतराची (बदलीची) मागणी केली
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !