|

भाग्यनगर (तेलंगाणा) – तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल; पण शहराचे नाव हैद्राबादच रहाणार आहे. निवडणूक हैद्राबाद आणि भाग्यनगर यांच्यामध्ये आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, हैद्राबादचे नाव पालटू नये, तर एम्आयएम्लाच मतदान करा, असे आवाहन एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे केले. येथील भाग्यनगर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यानिमित्त प्रचार करतांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेमध्ये सत्तेवर आल्यास हैद्राबादचे नाव पालटून भाग्यनगर केले जाईल, असे म्हटले होते. त्यावर ओवैसी यांनी वरील आव्हान दिले.
(सौजन्य : इंडिया टुडे)
ओवैसी म्हणाले की, भाजप हैद्राबादचे नाव पालटू इच्छित आहे. त्यांना सर्व जागांची नांवे पालटायची आहेत. तुमचे नाव पालटले जाईल; पण हैद्राबादचे नाव पालटले जाणार नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैद्राबादचे नाव पालटणार असल्याचे म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का ? असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले