देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

नवी देहली – गेल्या १५ दिवसांत देशाची राजधानी देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

(सौजन्य : Dilli Tak)

अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.