
नवी देहली – सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती सिद्धता केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि रुग्णांच्या हाताळणीच्या संदर्भात देहली, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनी २ दिवसांत अहवाल सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना रुग्णांवरील उपचार आणि मृत्यू झालेल्या मृतदेहांच्या हाताळणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. ‘सण-उत्सवांच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढून दुसरी लाट येऊ शकते’, अशी चेतावणी यापूर्वीच केंद्रीय समितीने दिली होती. तशीच परिस्थिती देशात निर्माण होत आहे. त्यामुळेच न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
न्यायालयाने देहली राज्याची बाजू मांडणारे महाअधिवक्ता संजय जैन यांना ‘देहलीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल सरकारने सादर करावा’, असा आदेश न्यायालयाने दिला. ‘कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक