अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

खानापूर (कर्नाटक) – खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे. तरी हे नामकरण तातडीने रहित करून त्या चौकाचे नाव ‘माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक’, असे करावे या मागणीसाठी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली १९ नोव्हेंबर या दिवशी भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी बांधकाम खात्यावर मोर्चा काढून निवेदन दिले. (लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने दक्षिण भारतातील ८ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंची मंदिरे पाडली. टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. अशा अत्याचारी टिपूचे नाव चौकाला कशासाठी ? भाजप शासनाने यात लक्ष घालून तातडीने नाव कसे पालटले जाईल असे पहावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा