मिरज- तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाच्या कामासाठी हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. या विरोधात काही दिवसांपासून ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी यांनी आंदोलन चालू केले होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार २४ जुलै या दिवशी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी पहाणी करून वृक्ष वाचवण्याविषयी चर्चा केली. सध्याच्या कामातील आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. याविषयीचा प्रस्ताव तातडीने मान्य केला असून त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश
मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !
- कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !