
मिरज- तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाच्या कामासाठी हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. या विरोधात काही दिवसांपासून ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी यांनी आंदोलन चालू केले होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार २४ जुलै या दिवशी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी पहाणी करून वृक्ष वाचवण्याविषयी चर्चा केली. सध्याच्या कामातील आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. याविषयीचा प्रस्ताव तातडीने मान्य केला असून त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !