मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी दिल्याचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मार्च २०२६ मध्ये बॅनर्जी यांनी एका भाषणात मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी दिली होती. २० मे या दिवशी कोलकात्यातील रहिवासी तुषार कांती दास यांनी बॅनर्जी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. तक्रारदाराचा आरोप होता की, बॅनर्जी यांच्या भाषणामुळे त्या वेळी निवडणुका असलेल्या राज्यात भीती,अपसमज आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांनी बॅनर्जी यांच्याविरुद्ध १२ जूनला गुन्हा नोंदवला.
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, ‘आमच्यामुळेच (तृणमूल काँग्रेसमुळेच) तुम्ही सर्व जण (हिंदू) सुस्थितीत आहात. जर असा दिवस आला की, आम्ही येथे (सत्तेत) नसू आणि जर एखादा विशिष्ट समुदाय (मुसलमान) एकवटला अन् त्यांनी तुम्हाला वेढा घातला, तर त्यांना तुम्हाला संपवायला केवळ एक क्षण लागेल.’
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !