
प्राचीन काळापासून आपल्याकडे साथीचे रोग पसरल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकले असेल किंवा सध्याचे उदाहरण, म्हणजे जगभरात आलेली ‘कोरोना’ची महामारी. या महामारीमुळे लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला. साथीच्या आजारांकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचे कारण विषाणू
किंवा जीवाणू असते; मात्र जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार करतो, तेव्हा त्याचे मूळ कारण लक्षात येते. आयुर्वेदानुसार एखादा आजार संपूर्ण शहराचा किंवा देशाचा नाश करतो, तेव्हा त्याला ‘जनपदोद्ध्वंस’ (साथीचे आजार) म्हणतात. यामागेही अधर्माचरण हेच कारण असते. येथे अधर्म, म्हणजे केवळ पूजा न करणे नव्हे, तर नैतिक मूल्यांचे अधःपतन, पराकोटीचा स्वार्थ, निसर्ग नियमांचे उल्लंघन, समष्टी पाप अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव असतो. जेव्हा समाजातील प्रभावशाली लोक किंवा बहुसंख्य जनता चुकीच्या मार्गाने वागू लागते, तेव्हा निसर्गातील चैतन्य शक्तीचा उद्रेक होतो. त्याच्या परिणामांमुळे साथीचे आजार उद्भवतात. जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.
– श्री. योगेश जलतारे, संपादक, सनातन प्रभात समूह
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !