सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘जीवन-मरण, चांगले-वाईट आणि ज्ञान–अज्ञान यांच्या मिश्रणालाच ‘माया’ किंवा ‘प्रकृती’ असे म्हणतात. तुम्ही सुखाच्या शोधात अनंत काळ फिरत राहिला, तर तुम्हाला पुष्कळ सुख मिळेल; पण त्याच्या समवेत तुम्हाला पुष्कळ दुःखही मिळेल. आम्हाला केवळ ‘चांगले हवे आहे, वाईट नको’, असे म्हणणे, म्हणजे बालोचित (अज्ञानातून झालेला) मूर्खपणा होय.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)