कर्नाटक राज्यातील ‘गोहत्याबंदी कायदा’ रहित करा ! – मुसलमान संघटनांची काँग्रेस सरकारकडे मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात गोहत्या बंदी कायदा मागे घ्यावा, अशी मागणी मुसलमान संघटनांनी सरकारकडे केली आहे. येथे मुसलमान महासंघाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्नाटक मुस्लिम संमेलना’मध्ये राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात समुदायाच्या नेत्यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘काँग्रेसने सत्तेवर येताच हा कायदा मागे घेण्याचे किंवा तो दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आतापर्यंत ते केलेले नाही; म्हणून हा जनविरोधी आणि अवैध कायदा तात्काळ रहित करावा’, अशी मागणी संमेलनाने सरकारकडे केली आहे.

‘यापूर्वीच्या भाजप सरकारने मुसलमानांना त्रास देण्याच्या उद्देशानेच गोहत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे बनावट गोरक्षकांना गुरांची वाहतूक करणार्‍यांवर आक्रमण करण्याची आणि त्यांना लुटण्याची सुवर्णसंधी मिळाल्यासारखे झाले आहे’, असा आरोप संमेलनात करण्यात आला.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत कर्नाटकातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने हा कायदा रहित केला नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल ! आता मुसलमान संघटनांनी मागणी केल्यानंतर पाकिस्तानी राजवट असणार्‍या काँग्रेस सरकारने तो रहित केला, तर आश्चर्य वाटू नये !