ठाणे – कसारा परिसरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १८ गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पकडला. १३ मे च्या रात्री कसारा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोवंशियांना कोंबून नेले जात असल्यामुळे ३ गोवंशियांचा मृत्यू झाला, तर १५ गोवंशियांची सुटका करण्यात आली. सुटका केलेले गोवंश जवळच्या मान्यताप्राप्त गोशाळेत हालवण्यात आले असून पुढील अन्वेषण कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
पोलिसांनी एका आरोपीला कह्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, तर त्याचे साथीदार पसार झाले आहेत. (महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असून गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही अशा प्रकारे सर्रास तस्करी होत असेल, तर यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक)
आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे शहापूर तालुका अध्यक्ष मुकेश बांगर, आणि उपाध्यक्ष जीतू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सचिन रडगे, विक्रम विदे, स्थानिक ग्रामस्थ आणि गोसेवक विलास धानके, वैभव धानके, शिवाजी भोईर, सुरेश भल्ला यांनी गोवंशियांना पकडून दिले. (स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षणासाठी कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक)

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !