
१. बालपणीच्या काही प्रसंगांचा परिणाम मनावर असल्यामुळे मनात सुप्त अशी असुरक्षिततेची भावना असणे आणि साधनेत आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधार देऊन नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे
‘प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग हे येतच असतात. त्याप्रमाणे माझ्याही जीवनात काही वेळा संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. बालपणीच्या काही प्रसंगांचा परिणामही माझ्या मनावर होता. त्यामुळे माझ्या मनात सुप्त अशी असुरक्षिततेची भावना होती. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर मला प्रत्येकच प्रसंगात प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) कायम आधार दिला आणि त्यातून सावरून घेतले. त्यांनी मला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आणि आजही तेच माझा सांभाळ करत आहेत.

२. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यावर मनाला स्वयंसूचनेद्वारे समजावल्याने मन स्थिर आणि निश्चिंत होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया (स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी नियमितपणे चुका लिहून त्यावर मनाला स्वयंसूचना घेणे) राबवण्यास सांगितली आहे. जेव्हा माझ्या मनात असुरक्षिततेचे विचार येतात, तेव्हा मी मनाला ‘आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच मला प्रत्येक प्रसंगात सांभाळले आहे आणि भविष्यातही तेच मला सांभाळणार आहेत’, या श्रद्धेने मी स्थिर आणि शांत राहीन’, अशी स्वयंसूचना देतो. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. त्यामुळे काळजी करू नकोस’, असे मनाला स्वयंसूचनेद्वारे समजावल्याने मन स्थिर आणि निश्चिंत होते.
३. त्रासदायक स्वप्ने पडणे आणि स्वयंसूचना घेतल्याचा झालेला लाभ
३ अ. रात्री वाईट स्वप्न पडणे किंवा वाईट शक्तींचा स्पर्श जाणवणे आणि दुसर्या दिवशी विविध त्रास होणे : ‘मागील वर्षभरात मी ही स्वयंसूचना सतत घेतली नाही, तरीही मला या स्वयंसूचनेचा एक निराळाच लाभ अनुभवता आला. मला रात्री झोपेत मधे मधे वाईट स्वप्न पडत किंवा ‘वाईट शक्तींचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवत असे. रात्री माझी प्राणशक्ती अल्प व्हायची. त्यामुळे दुसर्या दिवशी मला पुष्कळ थकवा येऊन दिवसभर अस्वस्थ जाणवत असे. मला धाप लागायची किंवा माझे डोके दुखत असे.
३ आ. मागील मासात वाईट स्वप्न पडणे; मात्र स्वभावदोषावर घेतलेल्या स्वयंसूचनेमुळे अंतर्मनाला असुरक्षिततेची जाणीव होताच ते सतर्क होणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा धावा करू लागल्यावर त्रासापासून रक्षण होणे : मागील मासातही मला २ वेळा अशी वाईट स्वप्ने पडली; मात्र या स्वप्नांचा शेवट सुखदायक होता. मी स्वप्नात प.पू. डॉक्टरांचा धावा करत असल्याचे मला जाणवायचे किंवा मला प.पू. डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन व्हायचे. ‘स्वप्नातच माझ्या अंतर्मनाला असुरक्षिततेची जाणीव होते आणि ते सतर्क होऊन प.पू. डॉक्टरांचा धावा करू लागते अन् माझे त्रासापासून रक्षण होते’, असे माझ्या लक्षात आले.
‘या अनुभूतीतून मला स्वयंसूचना घेण्याचे महत्त्व लक्षात आले आणि ते शास्त्र शिकवणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची थोरवी माझ्या लक्षात आली.’
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (८.४.२०२६)
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !