Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस

नवी देहली – आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत मिळणारे विनामूल्य उपचारांचे कवच ५ लाख रुपयांवरून वाढवून १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.

वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे आणि अवयव प्रत्यारोपण, कर्करोग आणि हृदय शस्त्रकर्म यांसारख्या महागड्या उपचारांसाठी सध्याची ५ लाख रुपयांची मर्यादा अपुरी पडत असल्याने समितीने ही मर्यादा १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य आणि कॅशलेस (नगदीविरहित) उपचारांची सुविधा मिळते.