
कोट्टायम (केरळम्) – येथील श्री महाविष्णु मंदिराच्या उत्सवात एका भजनी मंडळाने ख्रिस्ती भक्तीगीत गायल्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदु संघटना आणि प्रमुख नेते यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
Kottayam: Temple sees Christian devotional song performance, Hindu organisations express outrage !
Have you ever heard of Hindu devotional songs praising Hindu Deities being sung inside a church or a mosque ?
It is only Hindus who aggressively preach so-called secularism and… pic.twitter.com/gFVQfj6J13
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2026
१. मंदिराच्या कार्यक्रमात ‘नंदगोविंदम्’ नावाचे भजन हे मंडळ सादरीकरण करत होते. या वेळी मंडळाचे मुख्य गायक नवीन मोहन म्हणाले की, स्थानिक चर्चने या उत्सवासाठी वाहनतळासह अनेक सुविधा देऊन सहकार्य केले आहे. धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून आम्ही हे गाणे समर्पित करत आहोत. यानंतर मंडळाने ख्रिस्ती भक्तीगीत गायले.
२. या कृतीचे समर्थन करतांना नवीन मोहन म्हणाले की, जेव्हा मंदिरात दीप प्रज्वलित केला जातो, तेव्हा चर्चमध्येही दीप प्रज्वलित केला जातो. या सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ते गाणे गायले. भक्ती धर्मांच्या पलीकडची आहे.
३. भजनी मंडळाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसारित करून स्पष्टीकरण देतांना सांगितले की, आम्ही कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाही; कारण आम्हाला तिथे कोणतीही मर्यादा दिसलीच नाही. कुणाचेही मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.
४. मंदिर समितीही भजन मंडळाच्या पाठीशी उभी राहिली आहे. ‘विविध धर्मांचे लोक मंदिराच्या उपक्रमांमध्ये नियमितपणे सहकार्य करतात. या गाण्यामुळे कोणतीही चूक झालेली नाही’, असे समितीने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत मशिदीच्या विरोधात लढणार्या कोष्टी कुटुंबाला धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी !
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेली मांसाहाराची दुकाने बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हा देवस्थान इनाम निर्मूलन नव्हे, तर देवस्थान निर्मूलन अधिनियम ! – रत्नागिरीतील मंदिर विश्वस्तांचा घणाघात
मद्रास उच्च न्यायालयाने शाळेच्या भूमीवर चर्चच्या अनधिकृत बांधकामावर बंदी घातली
राज्यात २ जूनपासून आंदोलनांसह घंटानाद, महाआरती आणि स्वाक्षरी अभियान यांस प्रारंभ !