पुणे शहराच्या भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त

पुणे – येथील कोथरूड भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध देशांतील विद्यार्थी जे या महाविद्यालयात शिक्षण घेतात, त्यांनी त्यांच्या कला आणि संस्कृतीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात सुदान देशाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशातील लोककलेचे सादरीकरण करतांना हातात तलवारी घेऊन नृत्य केले, तसेच याच कार्यक्रमात बांगलादेशी विद्यार्थ्यांनी एक खाद्य पदार्थांचे विक्रीकेंद्रही लावले होते. तेथे बांगलादेशाचा झेंडा फडकवण्यात आला होता.
National Interest Over Everything. 🇮🇳✊
Pune Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) members shut down a stall featuring the Bangladeshi flag at MIT World Peace University. 🚫🚩
It’s time to ask: why are anti-India elements given space in our educational institutions?
India must… pic.twitter.com/wYohYZy8Ax
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 12, 2026
स्थानिक विद्यार्थ्यांनी या केंद्राविषयी एक पत्र महाविद्यालयाच्या प्रशासनाला पाठवले होते; मात्र त्यानंतरही बांगलादेशाच्या विद्यार्थ्यांनी तेथे विक्रीकेंद्र लावले. (बांगलादेशात हिंदूंनी असे केंद्र उभारले असते आणि त्याला विरोध झाला असता, तर हिंदूंनी केंद्र चालू ठेवले असते का ? – संपादक) ही गोष्ट भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन संबंधित खाद्य पदार्थांचे विक्रीकेंद्र बंद करून महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
सौजन्य : Pudhari News
भाजयुमोचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले की, शैक्षणिक संस्था या राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करण्याच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात आणि कोणताही निर्णय घेतांना व्यापक सामाजिक परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिका
|
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !