नामसाधनेचे श्रेष्ठत्व !
‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’
‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’
‘पाश्चात्त्यांनी सुखप्राप्तीसाठी विविध शोध लावले, तर भारतियांनी आनंद आणि शांती प्राप्त होण्यासाठी जनतेला आध्यात्मिक मार्गदर्शन करून साधना शिकवली. ‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती आहे.’
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला.
आतापर्यंत झालेले सर्व ‘जन्मोत्सव’ आणि ‘गुरुदेवांशी संबंधित कार्यक्रम’ यांमध्ये आजचा कार्यक्रम सर्वाधिक निर्गुण स्तरावर झाला. आज अनेक साधकांचे ध्यान लागले.’
परात्पर गुरु डॉक्टरांचे शरीर म्हणजे श्रीमन्नारायण आणि त्यांच्या शरिरातील प्राण म्हणजेच भगवान शंकर !
‘कर्मफलन्याय सिद्धांत’ सर्वांना लागू असतो. कृतज्ञता व्यक्त केल्याने कर्मफलत्याग होतो आणि कर्म अकर्म होते आणि देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. त्यामुळे साधक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता न्यून होते.
ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.
जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्या तरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेयही ईश्वराला अर्पण करणे, याला ‘कृतज्ञता’ म्हणतात.
गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची
रिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.