संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन साधकांनी तिसर्‍या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.

साधकांनो, आवश्यक त्या आरोग्य विषयक चाचण्या लवकर करून घ्या !

आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते. त्याचप्रमाणे अ‍ॅलोपॅथीनुसार कराव्या लागणार्‍या, वैद्यांकडे जाऊन नुसते तपासून घेणे यापासून ते रक्त-लघवी यांसारख्या सामान्य चाचण्यांपासून ते अधिक किचकट प्रकारच्या विविध चाचण्या सहजपणे करून घेणेही कठीण असते.

प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !

बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

साधक लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल.

महानगरे आणि मोठी शहरे येथे रहाणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.

साधकांनी यापुढे करावयाचे समष्टीसाठीचे (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे) नामजप

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक असलेले समष्टी नामजप आणि ते केल्याने होणारे लाभ

आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते ३१.५.२०२० या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

सध्या ‘कोरोना’मुळे भारतभरातील दळणवळण बंद असल्याने एप्रिल २०२० पासून कुंडलिनीचक्रांवर लावावयाच्या ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या वैयक्तिक स्तरावर बनवून घ्या !

१.४.२०२० ते ३०.६.२०२० या कालावधीत सहस्रार आणि विशुद्ध या चक्रांवर ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावायच्या आहेत.