बेळगाव येथे ‘हिंदू एकता दिंडी’त धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे २३ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली.

संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे आयुक्त मराठी भाषेचा उपयोग करत नसल्याच्या मराठी भाषा विभागाकडे तक्रारी !

ही आहे मराठी भाषेची दुर्दशा ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारकच करायला हवे ! संस्कृत भाषेनंतर सात्त्विक असणार्‍या मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन तिला सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे !

महाराष्ट्रात आयात कोळसा वापरण्यास प्रारंभ

विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा या पार्श्वभूमीवर आयात कोळसा वापरण्याविषयी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर चालू केला आहे.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

शासन आदेशानंतरही ५ वर्षे राज्यातील जलसाठ्यांची कामे मृद आणि जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केलीच नाहीत !

राज्यातील २५० ते ६०० घनसहस्र मीटर जलसाठ्यांतील गाळ उपशाची कामे जलसंपदा विभागाकडून मृद आणि जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्याविषयी सांगितलेले त्यांचे मत आहे, न्यायालयाचा निकाल नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल, तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला निश्चिती आहे की, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसमवेत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही.

अचलपूर आणि परतवाडा येथे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना नव्या नावांनी कार्यरत !

बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना कार्यरत होऊनही पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? हे त्यांचे अपयशच नव्हे का ?

मराठवाडा येथे १२ कोटींहून अधिक रुपयांची वीजचोरी उघड; ४ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल !

समाजाची नैतिकता अधोगतीला जात असल्याचे उदाहरण ! कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होत असतांना महावितरण आस्थापन झोपा काढत होते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? वीज चोरी करणार्‍यांवर दंड वसूल करण्यासमवेत कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.