राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्‍या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.

देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ

देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे.

देशभरात अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घाला ! – ‘निर्भया’च्या अधिवक्त्या सीमा समृद्धी कुशवाह यांची मागणी

या मागणीचा विचार करून प्रशासनाने अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालावी, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यात भारतियांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले !

पाश्‍चात्त्य विकृतीचा आणखी एक दुष्परिणाम ! आज विदेशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पाश्‍चात्त्य विकृतीचा दुष्परिणाम जाणून सरकार आणि प्रशासन यांनी अशा ‘अ‍ॅप’वर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी !

देशभरात कोरोनाचे ५८८ रुग्ण, एकूण ११ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६२ झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तमिळनाडू आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याचसमवेत देशाच्या वेगवेगळया भागातील कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून…

कोरोनामुळे जगभरात १९ सहस ६०७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १९ सहस्र ६०७ झाली आहे. एकूण १७५ देशांत ४ लाख ३४ सहस्र ९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. असे असले, तरी कोरोनाची लागण झालेले १ लाख ११ सहस्र ८७०…

देशात २१ दिवस संपूर्ण ‘दळणवळण बंदी’ लागू ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवसांची (१४ एप्रिलपर्यंत) ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात येत आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योगपतींकडून आर्थिक साहाय्याची घोषणा

भारतीय उद्योग श्रेत्रातील मोठी आस्थापने आणि व्यक्ती यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केले आहे.

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !