
१. इतरांचे कौतुक करणे
‘श्रीमती शिंदेआजींचे सुपुत्र सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीनल हे ठाणे सेवाकेंद्रात रहात असतांना शिंदेआजी ४ दिवस ठाणे सेवाकेंद्रात रहायला आल्या होत्या. तेव्हा साधिकांनी कोणताही पदार्थ केला, तरीही शिंदेआजी साधिकांचे कौतुक करत असत आणि स्वतःच्या नातेवाइकांनाही साधिकांविषयी कौतुकाने सांगत असत.
२. आज्ञापालन

त्या सद्गुरु राजनदादा यांच्याकडे मुलगा म्हणून न पहाता ‘सद्गुरु’ म्हणूनच पहात असत आणि त्यांनी सांगितलेले आजी सर्व ऐकत असत. सद्गुरु दादांनी सांगितलेले नामजपादी उपाय आजी करत असत.
३. प्रेमभाव
आजी पुष्कळ रुग्णाईत असतांना एकदा मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी ‘तू बरी आहेस ना ?’, अशी माझी विचारपूस केली. त्यांनी त्यांच्या सूनबाईंना (सौ. मीनलताईंना) मला खाऊ देण्यास सांगितले.
४. कृतज्ञताभाव
मी त्यांना भेटल्यावर त्या प्रत्येक वेळी ‘प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्यासाठी किती करतात ! त्यांच्यामुळे मी आहे’, असे सांगत असत.
‘गुरुमाऊलींच्या कृपेनेच शिंदेआजींचे गुण माझ्या लक्षात आले आणि लिहून देता आले’, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०२६)
|
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !