हिंदूंमध्ये दोष नेमका कुठे आहे ?

एका मुसलमानावर अन्याय झाला, तर जगभरात कुठेही असलेला मुसलमान का प्रतिक्रिया देतो ? याचे कारण नुकत्याच एका व्हिडिओतून समोर आले. बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार झाला, तर जगभरातील हिंदू काही का बोलत नाहीत ? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर, म्हणजे मुळातच हिंदु हा धर्म आहे आणि तो सांस्कृतिक विस्तारवादी पंथ नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती हे कोणत्याही थराला जाऊन स्वत:चा विस्तार करणारे पंथ आहेत. त्यांना देश लागत नाही. ते सगळे जगभर एकच आहेत. हिंदू तसे नाहीत.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

राष्ट्र ही संकल्पना त्यांच्या प्राथमिकतेत नाही. त्यांनी जगाची विभागणी दोनच भागांत केली आहे. जेव्हा जेव्हा पंथ आणि राष्ट्र यांत निवडायची वेळ येईल, तेव्हा तेव्हा ते पंथ निवडतात. ते त्यांना बंधनकारक आहे. राज्यघटना आणि कुराण यांत निवड करण्याची वेळ आली, तर ते कुराण निवडतात अन् तसे जाहीरपणे सांगतातही; म्हणून संपूर्ण जगात मुसलमान आणि ख्रिस्ती कुठेही असले, तरी ते ‘ब्रदरहूड’ (बंधुत्व) नावाखाली एकच असतात. आपल्या शेजारचा हिंदु आपल्यासाठी ‘हिंदु’ म्हणून जवळचा नसतो. केवळ ‘हिंदु’ असल्यामुळे काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार झाला, तेव्हा उर्वरित भारतातील सगळे हिंदू गप्प बसले. हेच मोपल्यांपासून आताच्या बंगालपर्यंत चालू आहे.

सांस्कृतिक विस्तारवाद करणारे पंथ आणि हिंदु धर्म यांना एकाच समान पातळीवर ठेवण्याची चूक राज्यघटना करते. चारा खाणारी गाय आणि गाय खाणारे श्वापद एकाच ठिकाणी आणून ठेवते. परिणाम व्हायचा तोच होतो. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अत्याचार आणि आसाममध्ये मुसलमानांवर अन्याय झाला; म्हणून मुंबईत वर्ष २०१२ मध्ये  ४० सहस्र धर्मांध तोडफोड करतात; पण भारतात हिंदूंवर झालेल्या अत्याचारासाठी हिंदू एकत्र येत नाहीत.

दोष ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि ‘सोशल’ (समाजवादी) असण्यात आहे; हिंदु असण्यात नाही.

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (२३.१२.२०२५)