गेल्या काही दिवसांत बांगलादेशात काय झाले, हे समजले. केवळ भारतीय दूतावासावर दगडफेक एवढाच विषय नव्हता. एका हिंदूवर त्याने प्रेषित महंमद यांच्याविषयी काहीतरी बोलल्याचा आरोप करून बांगलादेश पोलीस त्याला अटक करतात. मोठा जमाव गोळा होतो. ‘हा इस्लामचा गुन्हेगार आहे. याला आमच्या ताब्यात द्या’, अशी ओरड होते. बांगलादेश पोलीस सहजपणे त्या हिंदूला हिंसक जिहादी जमावाच्या स्वाधीन करते. जमाव त्या व्यक्तीला अमानुष मारहाण करत अर्धमेला झाल्यावर एका झाडाला टांगून जिवंत जाळून टाकतो.

भारताने मुत्सद्देगिरीसह शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकता !
ही सनातनी हिंदूंच्या सहनशक्तीची सीमा नाही का ? हा ‘जमात ए इस्लामी’चा पाकिस्तानी किंवा अफगाणी ‘फॉर्म्युला’ (पद्धत) नाही का ? ना अटक ना कायदेशीर कारवाई, थेट रस्त्यावर देहदंड. काहीही सुनावणी नाही. भविष्यातील अशाच घटनांसाठीची ही एक चाचणी नाही का ? बघायचे, भारत काय करतो ते !
आता वेळ आली आहे. प्रत्येक गोष्ट मुत्सद्देगिरीने सोडवता येत नसते. शक्तीप्रदर्शन लागतेच. मूर्ख भारतीय ‘सेक्युलर’ (निधर्मी) हिंदू अजूनही पक्षीय राजकारणात अडकले आहेत. इस्रायलने गाझापट्टी झोडपल्यावर आतंकवादी कतार, इजिप्त, इराक, लेबनन येथे पळाले. बांगलादेशीही असेच इस्लामी राष्ट्रात जाऊ शकतील; पण हिंदू कुठे पळून जातील ? आहे हिंदूंना थारा देणारा एकतरी देश ? वर्ष १९९८ मध्ये भारताने पोखरणमध्ये अणूचाचणी केल्यावर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे यांनी बंधने लादली होती िक नाही ? पण तेव्हाच्या भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने त्याचा धैर्याने सामना करत अमेरिकेला ती बंधने मागे घ्यायला भाग पाडले, हे आठवा.

बांगलादेशातील हिंदू शेष रहाण्यासाठी हे करावेच लागेल !
ज्यू मारले म्हणून इस्रायल गाझापट्टी बेचिराख करू शकतो. ख्रिस्ती अमेरिकेत कुण्या इस्लामी आतंकवाद्याने मारले; म्हणून अमेरिका लेबननवर १०० क्षेपणास्त्रांनी आक्रमण करू शकते, तर भारत बांगलादेशावर आक्रमण का करू शकत नाही ? भारतीय शक्तीची दहशत नको का ? भीती वाटायला नको का ? आंतरराष्ट्रीय विचार किंवा विरोध यांचा विचार करायला नको. हा प्रश्न भारताचा आहे. याच भारताने ६ सहस्र सैनिकांचे बलीदान देऊन बांगलादेश निर्माण केला. त्यामुळे बांगलादेशाला झोडायचा भारताला पूर्ण अधिकार आहे. बांगलादेशाला झोडपायची, भाजून काढायची वेळ आलेली आहे. आज भारत वर्ष १९७१ आणि वर्ष १९९९ पेक्षा ५० पट शक्तीशाली झालेला आहे. अशा प्रसंगीही कामाची नसतील, तर ‘तेजस’ अन् ‘राफेल’ ही लढाऊ विमाने, ‘पिनाका’ लढाऊ हेलिकॉप्टर, ‘आकाश’ आणि ‘एस् ४००’ क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली; ‘आकाश’, ‘पृथ्वी’ आणि ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे काय कामाची ?
बांगलादेशाला नष्ट करणे, एक मोठी हिंदु भूमी सिद्ध करणे, बांगलादेशातील हिंदूंना तिथे स्थानांतर करणे याखेरीज दुसरा उपाय दिसत नाही. आज शक्तीप्रदर्शन केले नाही, तर बांगलादेशात हिंदू शेष रहाणार नाहीत. एवढेच नाही, तर भविष्यात पाकिस्तानसारखीच एक शत्रूभूमी आम्ही जोपासणार.
– संजय वैद्य, जळगाव. (२१.१२.२०२५)
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे ‘जय श्रीराम’ !