Humayun Kabir : (म्हणे) ‘हे मुर्शिदाबाद असून येथे येऊन बाबरी मशिदीला कुणी हातही लावू शकत नाही !’

आमदार हुमायू कबीर यांची हिंदूंना अप्रत्यक्ष चेतावणी !

आमदार हुमायू कबीर

मुर्शिदाबाद (बंगाल) : ३ वर्षांत बाबरी मशीद उभी रहाणार असून कोणतीही सत्ता किंवा राजकीय शक्ती हे काम रोखू शकणार नाही. ही अयोध्या नाही. हे मुर्शिदाबाद आहे. इथे येऊन कुणीही बाबरी मशिदीला हात लावू शकत नाही, अशी चेतावणी येथील आमदार हुमायू कबीर यांनी दिली. त्यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेली असतांनाही ते बाबरी उभारण्यावर ठाम आहेत. त्यांनी बाबरीसाठी लोकांकडून पैसे गोळा करण्याचा चालू केले आहे. आतापर्यंत २० कोटी रुपयांहून अधिक पैसे आणि सहस्रो विटा गोळा झाल्या आहेत.

(म्हणे) ‘जय श्रीराम बोलणे चुकीचे नाही, तर ‘अल्लाहू अकबर’ बोलणेही चुकीचे नाही !’

हुमायू कबीर म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाद्रगस्त जागा श्रीराममंदिरासाठी देण्याचा निर्णय घेतला. आम्ही न्यायालयाचा निर्णय स्वीकारला असला, तरी बाबरी मशीद इतरत्र बांधली पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. माझा बाबराशी काहीही संबंध नाही. लोकांच्या मनात दुःख असल्यामुळे मी या मशिदीला ‘बाबरी’ असे नाव देत आहे. जर निवडणुकीत ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे योग्य असेल, तर मग ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) बोलणेही चुकीचे नाही. मशिदीसाठी २५ बिघा भूमी (साडे पंधरा एकर) विकत घेतली असून कागदपत्रांचे काम चालू आहे. प्रत्येक शुक्रवारी तिथे नमाजपठण केले जाईल.

Humayun Kabir News | “This Isn’t Ayodhya, Nobody Can Touch Babri Here”: Humayun Kabir To NDTV
(सौजन्य : NDTV)

संपादकीय भूमिका

या चेतावणीतून मुर्शिदाबाद भारतात नाही, तर बांगलादेशात किंवा पाकिस्तानात आहे, असेच कबीर अप्रत्यक्ष सांगत आहेत. धर्माच्या आधारे भारताची फाळणी होऊन आधी पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश स्थापन झाल्यानंतरही भारतात मुसलमान अशी धमकी देतात, हे हिंदूंना लज्जास्पद !