‘VB-G Ram G’ Bill : लोकसभेत ‘व्हीबी-जी राम जी’ विधेयक संमत

विरोधकांनी विधेयक फाडले !

(‘व्हीबी-जी राम जी’ म्हणजे भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण))

कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

नवी देहली – लोकसभेमध्ये ‘व्हीबी-जी राम जी’ विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. या वेळी विरोधकांनी विधेयकाविरुद्ध घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयक फाडून त्याचे कागद अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत फेकले. पूर्वीचे ‘मनरेगा’ (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम) कायद्यात पालट करून हे विधेयक निर्माण करण्यात आले आहे. मनरेगामधील महात्मा गांधी यांचे नाव काढल्यामुळे विरोधक याला विरोध करत आहेत.

देशात सर्वत्र गांधी आणि नेहरू यांचीच नावे !

कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की,

‘मनरेगा’ हे मूलतः महात्मा गांधी यांच्या नावावर नव्हते. ते मूलतः ‘नरेगा’ होते. नंतर वर्ष २००९ च्या निवडणुका आल्या तेव्हा मतांसाठी काँग्रेसला महात्मा गांधी यांची आठवण आली आणि मग यात महात्मा गांधी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. नेहरू कुटुंबाचे नाव किती योजनांना देण्यात आले ? ५५ राज्य सरकारी योजनांना राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले. ७४ रस्त्यांना राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले आणि १५ राष्ट्रीय उद्यानांना नेहरूंचे नाव देण्यात आले. काँग्रेस पक्षाला नामकरणाचे वेड आहे.

संपादकीय भूमिका

लोकशाही आणि राज्यघटना यांच्या कथित रक्षणावर बोलणारे काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष त्याच लोकशाहीचे आणि राज्यघटनेचे अशा प्रकारचे धिंडवडे काढत आहेत, हे जनता पहात आहे !