प्रत्येक दांपत्याने १ किंवा २ अपत्ये जन्माला घालावीत ! – Siddaramaiah

लोकसंख्या नियंत्रणासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना फुकाचा सल्ला !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

धारवाड (कर्नाटक) – आपण सगळे माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगायला हवे. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय विवाह अधिकाधिक व्हायला हवेत. आंतरजातीय विवाहांमुळे समानता येते. देशात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने १ किंवा २ अपत्ये जन्माला घालावीत, असा सल्ला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. आमदार कोनारेड्डी यांचे पुत्र नवीन यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी इतर ७५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मुख्यमंत्र्यांनी भाग घेऊन हा सल्ला दिला.

येथे सिद्धरामय्या म्हणाले की,

१. कोनारेड्डी यांनी केवळ मुलाचे लग्न न करता ७५ जोडप्यांसाठी सामूहिक विवाह आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक लोकांना एकत्र केले आहे. हे केवळ लग्न नसून एका मोठ्या जत्रेसारखे वाटत आहे, असे त्यांनी वर्णन केले. (सामूहिक विवाह अल्प खर्चाच्या दृष्टीने चांगला असला, तरी यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत आहे, असे जनतेला वाटते ! – संपादक)

२. मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाचे लोक हिंदूंसमवेत विवाह करत आहेत. (यामागे लव्ह जिहाद आहे. अन्य काही नाही,  हे सिद्धरामय्या सांगत नाही, हे लक्षात घ्या !  किती मुसलमान आणि ख्रिस्ती तरुणी हिंदु तरुणांसमवेत विवाह करतात, याची आकडेवारी सिद्धरामय्या देतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

हा नियम केवळ हिंदूंनाच लागू होतो का ? वास्तविक हिंदूंना या सल्ल्याची आवश्यकताही नाही; कारण बहुसंख्य हिंदू हे १ किंवा २ मुलांनाच जन्माला घालतात. ४ विवाह करून ढीगभर मुलांना जन्माला घालणार्‍या मुसलमानांना मुख्यमंत्री हा सल्ला का देत नाहीत ?