पुणे येथील केंद्र सरकार आणि सैन्यदल यांच्या भूमीवर वक्फ बोर्डाचे बेकायदेशीर नियंत्रण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी माहिती देत केली कारवाईची मागणी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करताना खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

नवी देहली – पुणे येथील भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पुणे छावणी क्षेत्रातील केंद्र सरकार आणि छावणी (कँटोनमेंट बोर्ड) बोर्ड यांची भूमी बेकायदेशीरपणे वक्फ मालमत्ता घोषित केल्याचे गंभीर प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

स्थानिक रहिवाशांकडून हे चिंताजनक सूत्र मांडण्यात आले असून येथील भूमी नोंदणीमध्ये झालेल्या अनियमितता, मालमत्तेचा कायदेशीर दर्जा पालटणे आणि संरक्षण मंत्रालयाच्या भूमी व्यवस्थापनाच्या प्रणालीला धोका निर्माण करणे असे गंभीर आरोप यात समाविष्ट आहे. या प्रकरणाची त्वरित आणि कालबद्ध चौकशी करून या गैरप्रकारावर अंकुश घालण्यात यावा, भूमीचा कायदेशीर दर्जा पुनर्संचयित करावा आणि दोषींविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे या वेळी केल्या.

संपादकीय भूमिका

वक्फ बोर्डाच्या माध्यमातून चालू असलेल्या या लँड जिहादचा फटका सरकार आणि सैन्य यांनाही बसत असल्यामुळे आता सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !