|

नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या दौर्यावर आल्यानंतर त्यांनी ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात कोठेही दोन्ही देशांमध्ये कोणताही मोठा संरक्षण करार झालेला नाही, हे दिसून आले. भारत आणि रशिया यांमध्ये लढाऊ विमान आणि ‘एस्-५००’ ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याविषयी करार होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
आम्ही भारताला शस्त्रास्त्रे पुरवत राहू ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन
पुतिन म्हणाले की, जवळजवळ ५० वर्षांपासून रशिया भारतीय सैन्याला शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरण करण्यात साहाय्य करत आहे; मग ते हवाई संरक्षण दल असो, विमान वाहतूक असो किंवा नौदल असो. रशिया आणि भारत हे दीर्घकाळापासून विश्वासार्ह व्यापारी भागीदार आहेत आणि दोन्ही देशांमधील व्यापार सातत्याने वाढत आहे. गेल्या ३ वर्षांत द्विपक्षीय व्यापारात विक्रमी ८० टक्के वाढ झाली आहे. रशिया कोणत्याही अडथळ्याविना भारताला तेलपुरवठा करत राहील. आज भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त धोरण राबवत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. भारतात अनेक क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे; परंतु दोन्ही देशांनी अद्याप त्यांचा पूर्णपणे लाभ घेतलेला नाही.
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव तार्यासारखी अढळ ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या ८ दशकांमध्ये जगाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सर्व काळात भारत-रशिया मैत्री नेहमीच ध्रुव तार्यासारखी अढळ आणि स्थिर राहिली आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला