
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहीम चालू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही, अशी चेतावणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ‘प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेलचे स्वयंपाकघर असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.
हॉटेलमधील स्वयंपाकघर कसे असावे ?, याविषयी आयुक्तांनी सांगितलेले नियम !
१. भिंती आणि लादी येथे टाईल्स लावलेल्या असाव्यात.
२. त्या टाईल्स धुता येण्यासारख्या असाव्यात. त्यांतून पाणी झिरपू नये.
३. पुरेशी हवा खेळती असावी.
४. एक्झॉस्ट (गरम हवा बाहेर घालवणारा पंखा) असावा.
५. कच्च्या मालासाठी आणि स्वयंपाक बनवण्यासाठी वेगळा विभाग असावा.
६. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
७. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावे.
८. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप (माशा पकडण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन) बसवावेत.
९. पेस्ट कंट्रोल (किटकांचा त्रास न्यून करण्याची प्रक्रिया) नियमित करावे.
१०. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळे, पाली, उंदीर यांचा प्रादुर्भाव नसावा.
११. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, साबण, हात पुसण्यासाठी पंचा ठेवावा.
१२. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून द्यावे.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment