विधानपरिषद कामकाज तारांकित प्रश्न
आवश्यक साहित्य केंद्र शासनाला सादर !
(एन्.सी.ई.आर्.टी. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ वगळण्यात आले होते. हा जाज्वल्य इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना मंत्री भुसे म्हणाले की, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांविषयीचे संदर्भ वगळल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या पुस्तकांतूनही हा नकाशा वगळण्यात आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सातारा येथे या विरोधात धडक मोर्चाही काढण्यात आला होता.
राज्यशासनाने ९ मार्चला नवी देहली येथील ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला पत्र पाठवून याविषयी विनंती केली आहे. पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास समाविष्ट करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य शासनाने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडे पाठवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, बालपण, स्वराज्य स्थापना, महाराजांची युद्धनीती (गनिमी कावा), किल्ले, प्रशासन, राज्याभिषेक आणि महाराजांनंतरचा मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास या सर्व सूत्रांचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा, यासाठी शासन आग्रही आहे.
या संदर्भातील सर्व कार्यवाही ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या देहली कार्यालयाच्या वतीने होत असल्याने राज्यशासन केंद्र सरकारशी याविषयी सतत संपर्क ठेवून आहे, असेही मंत्री भुसे यांनी शेवटी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत