देहलीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’

देहली – गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर देहलीत आतापासूनच धर्मजागृतीचा एक ज्वलंत उत्साह निर्माण झाला आहे. या भव्य आयोजनाची सिद्धता युद्धपातळीवर चालू झाली असून देहलीतील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते आणि गजबजलेल्या परिसरांमध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आकर्षक फलक झळकण्यास प्रारंभ झाला आहे.
या फलकांमुळे सर्वसामान्यांमध्ये या महोत्सवाविषयी उत्सुकता वाढली आहे.

देहली ही केवळ राजधानी नसून राष्ट्रीय निर्णयांची दिशा ठरवणारे केंद्र असल्यामुळे येथून सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे जावा, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांसह हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी हे लोकांपर्यंत महोत्सवाचा विचार पोचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांचे हे निःस्वार्थ प्रयत्न हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाप्रती असलेल्या त्यांच्या दृढनिष्ठेचे प्रतीक आहेत.

या वर्षी देहलीतील हा महोत्सव धर्माभिमान आणि राष्ट्रभक्ती यांचा भव्य समन्वय साधणारा ठरणार आहे. हा ‘शंखनाद’ संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल. देहलीतील हा साधना आणि संघटनशक्ती आगामी महोत्सवाला ऐतिहासिक उंचीवर नेईल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
अध्यात्मप्रसाराच्या सेवेच्या अंतर्गत राबवल्या जाणार्या मोहिमांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अभिप्रेत असलेला भावार्थ !