
नवी देहली : येथील एका बँकेच्या साहाय्यक शाखा व्यवस्थापिका प्रियंका राय यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या प्रकरणी त्यांनी देहली महानगरपालिकेविरुद्ध उच्च न्यायालयात २० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. आक्रमणाची घटना देहलीतील मालवीय नगरमधील खिरकी व्हिलेज रोड येथे ७ मार्च २०२५ या दिवशी रात्री सुमारे ९ वाजता घडली होती. कुत्र्यांनी त्यांच्या पायांवर ४२ ठिकाणी चावे घेतले होते. याचिकेनुसार राय यांनी १२ लाख रुपये जखमेच्या भागासाठी, ४ लाख २० सहस्र रुपये चाव्यांच्या खुणांसाठी आणि ३ लाख ८० सहस्र रुपये मानसिक वेदनेसाठी मागितले आहेत. न्यायालयाने महापालिकेला उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली असून पुढील सुनावणी मार्च २०२६ मध्ये होणार आहे.
यावर्षी देशात कुत्र्यांनी २६ लाखांहून अधिक लोकांना घेतला चावा !
माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत देशात २६ लाखांहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. वर्ष २०२४ मध्ये ही संख्या ३७ लाखांहून अधिक होती.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री