
नवी देहली : येथील एका बँकेच्या साहाय्यक शाखा व्यवस्थापिका प्रियंका राय यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या प्रकरणी त्यांनी देहली महानगरपालिकेविरुद्ध उच्च न्यायालयात २० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. आक्रमणाची घटना देहलीतील मालवीय नगरमधील खिरकी व्हिलेज रोड येथे ७ मार्च २०२५ या दिवशी रात्री सुमारे ९ वाजता घडली होती. कुत्र्यांनी त्यांच्या पायांवर ४२ ठिकाणी चावे घेतले होते. याचिकेनुसार राय यांनी १२ लाख रुपये जखमेच्या भागासाठी, ४ लाख २० सहस्र रुपये चाव्यांच्या खुणांसाठी आणि ३ लाख ८० सहस्र रुपये मानसिक वेदनेसाठी मागितले आहेत. न्यायालयाने महापालिकेला उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली असून पुढील सुनावणी मार्च २०२६ मध्ये होणार आहे.
यावर्षी देशात कुत्र्यांनी २६ लाखांहून अधिक लोकांना घेतला चावा !
माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत देशात २६ लाखांहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. वर्ष २०२४ मध्ये ही संख्या ३७ लाखांहून अधिक होती.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !