
मुंबई – मागील काही दिवसांपासून पशूवधगृहात हत्येसाठी नेण्यात येणार्या गायींच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा कुरेशी कसायांशी संघर्ष झाल्याच्या घटना घडत आहेत. गोरक्षक स्वत:च्या जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करत आहेत. गायींचे रक्षण होत असल्यामुळे कुरेशी कसायांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र कुरेशी कसायांनी चालू केले आहे, असा गंभीर आरोप महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
१७ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात शेतकरी आणि समस्त गोरक्षक हिंदु समाज यांच्या वतीने महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज आणि पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त केली. विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. मोहन सालेकर हे उपस्थित होते.
राजकारणासाठी गोमातेचा उपयोग करू नका ! – पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीकाही लोक सुपारी घेतल्याप्रमाणे गोरक्षकांविषयी अपप्रचार करत आहेत. हे लोक शेतकर्यांच्या आडून गोरक्षकांना लक्ष्य करत आहेत. यामागे कुरेशी कसायांच्या संघटनेचा हात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १ सहस्र ८० गोशाळा आहेत. हे गोशाळा संचालक प्रसंगी पदरमोड करून गोवंशियांचा सांभाळ करत आहेत. गोमाता हा धार्मिक विषय आहे. राजकारण्यांनी गोमातेचा उपयोग राजकारणासाठी करू नये. |
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री