
मुंबई – मागील काही दिवसांपासून पशूवधगृहात हत्येसाठी नेण्यात येणार्या गायींच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा कुरेशी कसायांशी संघर्ष झाल्याच्या घटना घडत आहेत. गोरक्षक स्वत:च्या जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करत आहेत. गायींचे रक्षण होत असल्यामुळे कुरेशी कसायांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र कुरेशी कसायांनी चालू केले आहे, असा गंभीर आरोप महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
१७ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात शेतकरी आणि समस्त गोरक्षक हिंदु समाज यांच्या वतीने महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज आणि पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त केली. विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. मोहन सालेकर हे उपस्थित होते.
राजकारणासाठी गोमातेचा उपयोग करू नका ! – पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीकाही लोक सुपारी घेतल्याप्रमाणे गोरक्षकांविषयी अपप्रचार करत आहेत. हे लोक शेतकर्यांच्या आडून गोरक्षकांना लक्ष्य करत आहेत. यामागे कुरेशी कसायांच्या संघटनेचा हात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १ सहस्र ८० गोशाळा आहेत. हे गोशाळा संचालक प्रसंगी पदरमोड करून गोवंशियांचा सांभाळ करत आहेत. गोमाता हा धार्मिक विषय आहे. राजकारण्यांनी गोमातेचा उपयोग राजकारणासाठी करू नये. |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !