एन्.सी.ई.आर्.टी. अभ्यासक्रमातील पालटांवरून असदुद्दीन ओवैसी यांचा दावा

भाग्यनगर (तेलंगाणा) – ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एन्.सी.ई.आर्.टी. (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) अभ्यासक्रमातील पालटांवरून भाजप सरकारवर टीका केली आहे.
Asaduddin Owaisi claims in context of NCERT curriculum changes that Veer Savarkar made the first demand for India’s partition!
By making such false statements, does Owaisi think Indians are fools?
A criminal case should be filed against him for this statement, & he should be… pic.twitter.com/Lus3pGEznd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
ते म्हणाले की, ‘सुधारित अभ्यासक्रमात भारताच्या विभाजनासाठी मुसलमान समाजाला उत्तरदायी धरले गेले आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की, विभाजनाची कल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्याचे दायित्व माऊंटबॅटन आणि त्या वेळचे काँग्रेस सरकार यांचे होते. फाळणीसाठी मुसलमानांना दोषी धरता येणार नाही.’
पंडित नथुराम गोडसे यांच्याविषयीची माहिती काढून टाकल्याचा आरोप
खासदार ओवैसी यांनी पुढे म्हटले की, नथुराम गोडसे याने म. गांधी यांची हत्या केली, हेही अभ्यासक्रमातून काढून टाकले आहे. ‘गोडसेने गांधींना का ठार मारले ?’, हे तुम्ही का हटवले ?
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे विधान करून ओवैसी भारतियांना मूर्ख समजतात का ? या विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! |
वीर सावरकर उवाच
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !