|

नवी देहली – पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू करण्यात आले, अशी माहिती केंद्रशासनाने पहिल्यांदाच संसदेत दिली.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे २०२५ या दिवशी पाकिस्तानचे ९ आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय सैन्यतळ आणि नागरिक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली. १० मे या दिवशी पाकिस्तानच्या सैन्य कारवाईच्या महासंचालकांनी भारतीय सैन्य कारवाईच्या महासंचालकांशी संपर्क साधला आणि कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी नंतर युद्धबंदीवर सहमती झाली.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !