|

नवी देहली – पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी अलीकडेच एका पोस्टमध्ये म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगालवर आक्रमण केले होते. हे वक्तव्य केंद्रशासनाने एन्.सी.ई.आर्.टी.च्या (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) पुस्तकांमधून मोगलांच्या क्रौर्याचे वास्तव दाखवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आले. सरदेसाई यांना हे सहन झाल्याने त्यांनी मोगलांची बाजू घेत छत्रपती शिवाजी महाराजांवर वरील आक्षेपार्ह विधान केले.
"Shivaji Maharaj invaded Bengal" – claims anti-Hindu journo Rajdeep Sardesai to defend Mughal brutality!
After backlash, he quietly says it was Surat, not Bengal! 🤥
Why call it loot when Chhatrapati Shivaji Maharaj reclaimed what Mughals plundered from Hindus? 💰⚔️
These… pic.twitter.com/GWnpPZX4u1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2025
ते ‘डेमोक्रॅटिक न्यूज रूम’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘डाकू’ म्हणून उल्लेख करत त्यांच्या सैन्याने बंगालवर आक्रमण करून लूट केली, असे भासवण्याचा प्रयत्न केला.
Rajeep @sardesairajdeep slanders Shivaji Maharaj.
He says "Shivaji raided Bengal. He didn't differentiate between Hindus and Muslims. He looted all people. Just like Mughals" (Timestamp 1.58).
FOOL,
Shivaji Maharaj never set his foot in Bengal. Neither did Shivaji's armies. pic.twitter.com/n3F1pelOT4
— True Indology (@TrueIndology) July 19, 2025
यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यावर त्यांनी बंगाल नाही, तर सुरत अशी सुधारणा करण्याची पोस्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वेळी क्षमा मागण्याचेही टाळले.
सरदेसाई यांनी सुधारित पोस्ट मध्ये म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगालवर नव्हे, तर सूरतवर आक्रमण केले होते. तो मोगल साम्राज्यावर प्रहार होता.’
सरदेसाई यांची सुधारित पोस्ट –
Correction: Pl note: the great Chatrapati Shivaji Maharaj did NOT raid Bengal But attacked Surat in strategic raids that struck at Mughal power. It was the subsequent Maratha armies which attacked Bengal repeatedly between 1742 and 1751. Apologies for my mistake. (reference…
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) July 19, 2025
त्याचबरोबर सरदेसाई यांनी शिवाजी महाराजांना त्या युगातील सर्वोत्तम शासक म्हणून वर्णन केले आणि त्यांच्या सैन्य कौशल्याचे अन् जनकल्याणाच्या निर्णयांचे कौतुक केले.
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !