…हे आहे महाराष्ट्राचे पुरोगामित्व आणि भारताचे निधर्मीपण !

श्री. अभिजित जोग

वर्ष १२९३ मध्ये आक्रमक बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापिठाचा विध्वंस करून तेथील विद्यार्थी आणि अध्यापक यांच्या कत्तली केल्या. भारतीय ज्ञानाचा खजिना असलेले तेथील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते. आजही नालंदाच्या रेल्वेस्थानकाचे नाव आहे बख्तियारपूर…! हे चालते; पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची पताका देहलीपार फडकवणार्‍या महापराक्रमी बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वेस्थानकाला दिलेले चालत नाही…!

हा आहे भारताचा ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीपणा)… आणि हे आहे महाराष्ट्राचे पुरोगामित्व !

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२७.६.२०२५)