Turkish Tourism Down : मे मासामध्ये तुर्कीयेत पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांच्या संख्येत २४ टक्के घट !

तुर्कीयेने पाकला सैनिकी साहाय्य केल्यानंतर भारतियांनी बहिष्काराच्या केलेले आवाहनाचा परिणाम

नवी देहली – तुर्कीयेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानला सैनिकी साहाय्य केल्यामुळे भारतियांकडून तुर्कीयेवर बहिष्कार घालण्याची चळवळ सामाजिक माध्यमांद्वारे राबवण्यात येऊ लागली. यामुळे मे मासामध्ये तुर्कीयेला पर्यटनासाठी भेट देणार्‍या भारतियांच्या संख्येत २४ टक्क्यांची घट झाली आहे.

भारतातून प्रत्येक वर्षाला तुर्कीयेतील इस्तंबूल, कॅपाडोसिया आणि एंटाल्या यांसारखी ठिकाण फिराण्याची भारतियांची मोठी पसंती असते; मात्र भारतियांनी बहिष्कार घोषित केल्यानंतर ‘भारतीय ट्रॅव्हल एजन्सी’ आणि ‘टूर ऑपरेटर्स’ यांनी तुर्कीयेच्या सहलींमध्ये कपात करण्यास चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

ही घट १०० टक्के होणे आवश्यक आहे. ती झाली नाही, याचा अर्थ अजूनही भारतियांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झालेले नाही, असेच म्हणावे लागेल !