केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य यांचे विशेष अभिनंदन !- स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. देशातील जनतेने मोदी सरकारच्या पाठीशी उभे रहायला हवे. पक्षभेद विसरून सर्व लोकांनी भारत सरकारचे समर्थन करायला हव. आपल्यासाठी देश महत्त्वाचा आहे. भविष्यात सिंदूरहूनही मोठी कारवाई करण्याची मोदी सरकारची क्षमता आहे, असे ‘अखिल भारतीय संत समिती’चे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचे मत ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केले.