जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिलला आतंकवाद्यांनी धर्म विचारून २८ पर्यटकांची गोळी मारून हत्या केली. या घटनेचा देशभरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत पाकला धडा शिकवण्याची मागणी केली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतांनाच भारतीय वायूदलाने ६ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे हवाई आक्रमण केले. यामध्ये एकूण ९ आतंकवादी तळांवर आक्रमण करून १०० आतंकवादी मारल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दासिर यांचा समावेश आहे. ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने म्हटले आहे की, ‘सुभान अल्लाह’ मशिदीवरील आक्रमणात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले आहेत. भारताने ही प्रत्युत्तराची कारवाई पहलगाम आक्रमणाच्या १५ दिवसांनंतर केली असून या योजनेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. मोहिमेचे हे नाव त्या महिलांना समर्पित आहे, ज्यांचे पती २२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे आतंकवाद्यांनी मारले होते. पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, ‘‘भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत. पंतप्रधान मोदी रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून होते.’’
गेल्या ५ वर्षांत आतंकवाद्यांनी काश्मीरमधील उरी आणि पुलवामा येथे आक्रमण केले. या आक्रमणात अनुक्रमे १९ आणि ४० भारतीय सैनिक हुतात्मा झाले. या आक्रमणांनंतरही ‘एअर स्ट्राईक’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आले. त्यामुळे आता झालेल्या जिहादी आक्रमणानंतर पाकला दयामाया न दाखवता त्याला अद्दल घडेल, असा धडा शिकवणे आवश्यक होते. पहलगाम येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यानंतर भारताने पाकच्या विरोधात मोठी कारवाई करायला प्रारंभ केला आहे. भारताने पाकिस्तानकडून होणार्या सर्व आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या जहाजांना भारताच्या बंदरात प्रवेश दिला जात नाही. भारताने ‘सिंधु जल करार’ स्थगित केला आहे. त्यानंतर या दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्रही बंद केले आहे.
पाकची योजना
खरेतर पाकिस्तान हा गेल्या काही दिवसांपासून भारताच्या आक्रमणाच्या भीतीने घाबरला आहे. त्यातच देशांतर्गत सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने सरकार घाबरले आहे. भारताने व्यापार बंद केल्यापासून पाकिस्तानात महागाईचा भडका उडाल्याने पाकची जनता उपाशी मरत आहे. पाकवर आर्थिक बहिष्कार घालणे, हेही युद्धासारखेच आहे. पाकिस्तानातील ४ प्रांतांमधील सिंध राज्यातील जनता केंद्र आणि लष्कर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. हेही कमी म्हणून की काय, बलुचिस्तानमधील नागरिकही पाक सैन्य आणि सरकार यांच्या विरोधात ‘बलुचिस्तान स्वातंत्र्या’साठी सशस्त्र आक्रमण करून कारवाई करत आहेत. या सगळ्या सूत्रांवरून जनतेसह अन्य देशांचे लक्ष भरकटवण्यासाठी काश्मीरचे सूत्र उपस्थित करून पहलगाममध्ये आतंकवादी आक्रमण करण्यात आले. हे आक्रमण केल्यानंतरही कांगावखोर पाकने नियंत्रण रेषेवर गोळीबार करणे, जिहाद्यांनी हिंदूंच्या हत्या करणे, आदी चालूच ठेवले. दुसरीकडे इस्लामी देशांची संघटना, तुर्कस्तान, चीन, युरोपातील काही देश यांच्याशी संपर्क साधून भारताच्या विरोधात जनमत सिद्ध करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी केला; पण नेहमीप्रमाणेच पाकचा खरा चेहरा उघड झाला.
छुपा पाकिस्तानही उद्ध्वस्त करा !
एकीकडे पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या तळावर भारताने कारवाई केली असली, तरी दुसरीकडे भारताच्या अंतर्गत शत्रूंचा उन्माद याच काळात वाढण्याचीही चिन्हे आहेत. दिवंगत सैन्यदलप्रमुख बिपीन रावत म्हणाले होते, ‘‘भारतीय सैन्य बाह्य शत्रूंशी लढू शकते; पण अंर्तगत शत्रूंचा बीमोड करणे अवघड असून त्याला पोलीस आणि जनता यांना सामोरे जावे लागणार आहे.’’ यातून हेच लक्षात येते की, खरा पाकिस्तान हा भारत देशाच्या आतमध्ये बसलेला आहे. भारताला ‘दार-उल्-इस्लाम’ करण्यासाठी जी दीर्घकालीन जिहाद करण्याची योजना आहे, त्यासाठी पाकिस्तानच्या रूपाने एक सुरक्षित तळ निर्माण करण्यात आलेला आहे. हा पाकिस्तानरूपी तळ निर्माण करण्यामध्ये उत्तरप्रदेश, मुंबई, भाग्यनगर आणि बिहार येथील मुसलमानांचा पुष्कळ मोठा वाटा आहे. येथील अनेक मुसलमानांचे अनेक पाहुणे आणि नातेवाईक पाकिस्तानमध्ये आहेत अन् त्यांचे आजही नातेसंबंध होत असतात, हे केंद्र सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडून देण्याविषयी दिलेल्या चेतावणीतून दिसून आले. त्यामुळे जेव्हा जेव्हा उघडपणे पाकिस्तानला दणका बसतो, तेव्हा छुपा पाकिस्तानी गट कार्यरत होतो, हे आजपर्यंत दिसून आले आहे.
उघड शत्रू असलेला पाकिस्तान भारताविरुद्ध प्रत्यक्ष इस्लामी जिहाद पुकारतो; कारण तो इस्लामी देश आहे; पण भारतात बसलेला ‘छुपा पाकिस्तान’ हा देशाला ‘धर्मनिरपेक्षते’मुळे जड जात आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास गेल्यावर तो दंगल, अत्याचार आदी अन्य मार्गांनी भारताला जड जातो. सैन्य सामर्थ्याच्या जोरावर पाकिस्तानला कधीही नेस्तानाबूत करता येईल; पण भारताच्या लोकशाही कोषात सुरक्षितपणे बसलेल्या आणि दिवसेंदिवस फुगत चाललेच्या छुप्या पाकिस्तानातील जिहादी, धर्मांध, साम्यवादी, पुरो(अधो)गामी यांना धडा शिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे अन् केंद्र सरकार अशांना वठणीवर कसा आणणार ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
पाकचा विनाशच हवा !
भारताने पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून जरी पहलगामचा सूड घेतला असला, सैन्याने केलेली कारवाई अचूक आणि प्रभावी झाली, त्यामुळे भारतीय सैन्याची प्रतिष्ठा नक्कीच उंचावली गेली. असे असले, तरी जिहाद्यांचे मूळ असलेली पाकरूपी समस्या संपलेली नाही. या आक्रमणात शेकडो आतंकवादी मारले गेले; पण पाकच्या मदरशांमधून प्रतिदिन सहस्रो जिहादी सिद्ध होत आहेत. त्यांचे आपण काय करणार ?, हाही प्रश्न आहे. जो पाकिस्तान काश्मीरच्या कथित मुक्तीसाठी वारंवार जिहादी आक्रमणे आणि युद्ध करत आहे, तो पाक नक्कीच शांत बसणार नाही. तो आज ना उद्या पुन्हा आक्रमण करून युद्ध पुकारेल आणि पुन्हा आतंकवादी आक्रमणे घडवून आणेल. हे आक्रमण आणि ‘एअर’ वा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यांचे चक्र किती दिवस चालू ठेवणार ? किती दिवस निष्पाप भारतीय अन् हिंदूंच्या हत्या होऊ देणार ? यापेक्षा पाकला जन्माची अद्दल घडवायची असेल, तर भारतीय सैन्याने पाकमध्ये घुसून त्याला कायमचे नेस्तनाबूत करायला हवे, तर आणि तरच भारतात शांती नांदेल, हे निश्चित !
एका ‘एअर स्ट्राईक’ने नव्हे, तर पाकच्या समूळ नायनाटानेच भारतियांना कायमची शांती लाभेल ! |