‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ? व्यक्तीच्या मेंदूचे कार्य करण्याचे स्वरूप कसे आहे ? इंग्रजीतील ‘कर्सिव (अक्षरे जोडून वळणदार पद्धतीने सलग लिहिणे)’ लिखाणाच्या पद्धतीमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर कोणता परिणाम होतो ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. (भाग २)
या लेखाचा या पूर्वीचा भाग बघण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902365.html

२ ई. लिखाणात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने होणारे लाभ
२ ई १. मनोबल वाढणे : ‘लिखाण करतांना दोन शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने त्या त्या शब्दांतील सर्व स्पंदने व्यक्तीच्या मनापर्यंत पोचतात. त्यामुळे त्या शब्दांचा व्यक्तीच्या मनावर सहजतेने संस्कार होतो, परिणामी व्यक्तीला तो विषय सहजतेने समजतो आणि त्याचे आकलन होते. या प्रक्रियेतून मनाशी संबंधित ‘दमयंती’ या शक्तीत वाढ होते. त्यामुळे मनाचे बळ टिकून रहाते आणि ते आणखी वाढते. या प्रक्रियेला ‘मनोपुष्टी’, असे म्हणतात.
२ ई २. मनात विविध विषयांचे ज्ञान सहजतेने साठवले जाणे : ‘दमयंती’ या शक्तीकडे ‘संग्राह्य’ विद्या असते. त्यामुळे व्यक्तीला विविध विषयांद्वारे प्राप्त झालेले ज्ञान मनामध्ये साठवले जाते. मनामध्ये माहिती साठवण्याच्या प्रक्रियेला ‘मनाची भरण क्रिया’, असेही म्हणतात. मन विविध विषयांनी भरले जाते; म्हणून त्याला ‘भरण’, असे म्हटले आहे. लिखाणात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने हे ज्ञान मनामध्ये साठवून ठेवण्याची क्रिया सहजतेने होते.
२ ई ३. मनाला निर्गुण तत्त्व मिळून विषयाचे सहजतेने आकलन होणे : शब्दांमध्ये सगुण तत्त्व, तर दोन अक्षरांतील अंतरामध्ये निर्गुण तत्त्व असते. शब्द लिहितांना त्यात अंतर ठेवल्याने लिखाण करणार्या व्यक्तीला सगुण आणि निर्गुण या दोन्ही तत्त्वांचा लाभ होतो. शब्दांतील सगुण तत्त्वामुळे व्यक्तीला त्यांतील ज्ञान ग्रहण करणे सुलभ, तर त्या शब्दांतील अंतरातून निर्माण होणार्या निर्गुण तत्त्वामुळे व्यक्तीला त्या विषयाचे आकलन होण्याची प्रक्रिया सहजतेने होते.
२ ई ४. सात्त्विक लिखाणातील सकारात्मकता वाढणे आणि रज-तमयुक्त लिखाणातील नकारात्मकता न्यून होणे : संत, देव आणि साधना यांविषयी लिखाण करतांना शब्दांत अंतर ठेवून लिखाण केल्याने व्यक्तीला सगुण-निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो. त्यामुळे लिखाणातील सकारात्मकतेत वाढ होते. साधना न करणार्या व्यक्तीच्या लिखाणात रज-तम असते; परंतु तिने अक्षरशास्त्राच्या नियमांचे पालन करून लिखाण करतांना दोन शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने त्यातून काही अंशी निर्गुण तत्त्व निर्माण होते. परिणामी अशा लिखाणातील रज-तम काही अंशी न्यून होण्यास साहाय्य होते.
२ ई ५. लिखाणातील सूक्ष्म लहरी मेंदूला सहजतेने ग्रहण होणे : शब्दांमध्ये विषयाशी संबंधित ज्ञान असते. शब्दांमध्ये अंतर असलेले लिखाण वाचतांना त्यातील ज्ञानाच्या सूक्ष्म लहरी मेंदूला टप्प्याटप्प्याने प्राप्त होतात. त्यामुळे मेंदूला त्या विषयाचे सहजतेने आकलन होणे आणि विषयाची ‘साठवण करणे’, ही क्रिया उत्तम प्रकारे साध्य करता येते. यातून मेंदूचे कार्य अल्प शक्तीत पूर्ण होते, तसेच मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेत वाढ होते.
२ ई ६. मेंदूच्या क्षमतेत वाढ होणे : ‘लिखाणात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने मेंदूच्या क्षमतेत वाढ कशी होते ?’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण

पुढे दिले आहे.
२ ई ६ अ. दीग्विशाल : ‘दी’ म्हणजे मेंदूच्या पेशी. ‘ग्’ हा शब्द त्या पेशीतून प्रवाहित होणार्या शक्तीला उद्देशून आहे. ‘विशाल’ हा शब्द मेंदूच्या कार्याची व्याप्ती दर्शवतो. व्यक्तीच्या मेंदूशी संबंधित पेशी आणि त्यांतील शक्ती अन् मेंदूच्या कार्याची व्याप्ती यांना ‘दीग्विशाल’, असे म्हणतात.
व्यक्तीला प्रथम शब्दांतील ज्ञान मनाद्वारे ग्रहण होते. त्यानंतर मनातील सूक्ष्म लहरी मेंदूच्या काही पेशींद्वारे मेंदूच्या बाह्य, मध्य आणि अंतर् या भागांपर्यंत पोचतात. हे ज्ञान व्यक्तीच्या बुद्धीद्वारे कार्यानुरूप आवश्यक तेव्हा प्रगट होऊन कार्य करते.
२ ई ६ आ. दीग्मेधा : ‘मेधा’ ही व्यक्तीच्या मेंदूशी संबंधित शक्ती मानली आहे. ‘मेधा’ ही शक्ती व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व्यक्तीच्या मनाद्वारे गोळा करते अन् ते सुयोग्य पद्धतीने मेंदूपर्यंत पोचवते. त्यामुळे व्यक्ती विविध प्रकारचे कार्य सहजतेने करू शकते.
२ ई ६ इ. दीग्बंधा : ‘दीग्मेधा’ ही शक्ती विविध विषयांचे ज्ञान मेंदूच्या बाह्य, मध्य आणि अंतर् या भागांपर्यंत पोचवते; परंतु प्रसंगानुरूप ते ज्ञान एकमेकांशी जोडण्याचे कार्य ‘दीग्बंधा’ ही शक्ती करत असते.
लिखाण करतांना शब्द जोडून न लिहिता त्यांत अंतर ठेवल्याने त्या शब्दांतील ज्ञानाच्या सूक्ष्म लहरी सुस्पष्टपणे मेंदूला प्राप्त होतात. त्यामुळे मेंदूच्या ‘दीग्विशाल’, ‘दीग्मेधा’ आणि ‘दीग्बंधा’, या शक्तींचे कार्य सुलभ अन् सहजतेने होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून व्यक्तीच्या मेंदूचे कार्य करण्याची क्षमता वाढते.
(टीप : दीग्मेधा आणि दीग्बंधा या शब्दांतील ‘दीग्’ या शब्दाचा अर्थ सूत्र क्र. ‘२ ई ६ अ’नुसार आहे.)
२ उ. कर्सिव लिखाणाच्या पद्धतीमुळे होणारी हानी : ५ व्या पाताळातील ‘मही’ या असुराने इंग्रजी लिखाणात आणखी संशोधन करून कर्सिव लिपीची निर्मिती केली आहे. त्यात शब्दांमध्ये अंतर न ठेवता ते जोडून लिहिले जातात. या लिपीमुळे होणारी आध्यात्मिक हानी येथे दिली आहे.
२ उ १. व्यक्तीची मानसिक आणि बौद्धिक क्षमता न्यून होणे : कर्सिव लिपीद्वारे तमोगुणी लहरींची निर्मिती होते. यातून कर्सिव लिखाण करणार्या व्यक्तीचे मन आणखी चंचल होते आणि तिची बुद्धी अस्थिर होते. परिणामी अशा व्यक्तीची मानसिक अन् बौद्धिक क्षमता न्यून होऊ लागते.
२ उ २. वातावरणात दूषित वायूची निर्मिती करणे : इंग्रजी भाषेत मुळातच त्रासदायक शक्ती आहे. कर्सिव लिखाणात शब्द जोडून लिहिण्याच्या पद्धतीमुळे त्रासदायक शक्तीची शृृंंखला सिद्ध होते. परिणामी त्या लिपीतील त्रासदायक शक्तीत वाढ होते अन् तेथील वायूमंडल दूषित होते. वायूमंडल दूषित झाल्याने कर्सिव लिखाण करणार्याला ‘न सुचणे, मन अस्वस्थ होणे, अकस्मात् निराशा येणे आणि मायेतील विचारांमध्ये वाढ होणे’, हे त्रास होऊ शकतात.
२ उ ३. कर्सिव लिखाणाचा वाचकावरील परिणाम : कर्सिव लिपीतील लिखाण वाचतांना व्यक्तीला शब्दांचे आकलन होण्यासाठी शक्तीचा पुष्कळ व्यय करावा लागतो. या लिपीतील लिखाणाचे वाचन करतांना ‘ग्लानी येणे, मन निरुत्साही होणे, बुद्धी भ्रमित होणे आणि थकवा येणे’, हे त्रास होऊ शकतात.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२४)
|