|

मथुरा/वृंदावन (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावनमध्ये संत अन् सामाजिक संघटना यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्युटी पार्लरसारख्या संस्थांचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. येथील ब्युटी पार्लर ‘लव्ह जिहाद’चे केंद्र बनत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ब्युटी पार्लरमध्ये काम करणारे मुसलमान तरुण हिंदु महिलांना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहेत, असा दावा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणाशी संबंधित हिंदु नेते दिनेश फलाहारी यांनी केला आहे. ‘पार्लर जिहाद’चा हा विषय एका नवीन सामाजिक आणि सांप्रदायिक वादाला जन्म देत आहे, जो आधीच चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’ वादाचा विस्तार असल्याचे दिसून येते, असे दिनेश फलाहारी यांनी म्हटले आहे.
१. मथुरा आणि वृंदावन येथील संत समाजाचा दावा आहे की, आतापर्यंत मथुरा, वृंदावन भागातील १३ हून अधिक हिंदु मुलींना मुसलमान तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना मुंबईसह इतर महानगरांमध्ये नेले आहे. तेथे त्यांना इस्लाम स्वीकारण्यास आणि लग्न करण्यास भाग पाडण्यात आले आहे.
२. पूर्वी हे मुसलमान तरुण शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात सक्रीय असत. आता त्यांनी ब्युटी पार्लर हे माध्यम बनवले आहे. ब्युटी पार्लरमध्ये येणार्या हिंदु महिलांना भावनिक सापळ्यात अडकवले जात आहे. येथे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे.
३. या ‘लव्ह जिहाद’च्या कारवायामागे बंदी घातलेली संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (पीएफ्आय) संबंध असू शकतो, असा आरोप अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
४. ‘पार्लर जिहाद’चे हे जाळे मथुरापुरते मर्यादित नाही, तर ते बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, रामपूर इत्यादी जिल्ह्यांमध्येही पसरले आहे. विशेषतः न्हावी म्हणून हे मुसलमान तरुण धार्मिक स्थळांभोवती ब्युटी पार्लरमध्ये काम करून हिंदु महिलांच्या संपर्कात येतात.
५. ‘लव्ह जिहाद’ हे वैयक्तिक प्रेम प्रकरण नाही, तर ते एक सुनियोजित षडयंत्र आहे. हे एक सांस्कृतिक आक्रमण आहे. त्याचा उद्देश हिंदु मुलींना त्यांच्या धर्मापासून आणि कुटुंबांपासून तोडणे हा आहे, असे साध्वी सरस्वती दीदी यांनी म्हटले आहे.
६. संत समाजाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बिजनौर आणि सहारनपूरमध्ये मुसलमान न्हाव्यांची टोळी सक्रीय !
या जिल्ह्यांमधून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे मुसलमान तरुणांनी बनावट ओळखपत्रे सिद्ध करून हिंदु मुलींशी संबंध प्रस्थापित केले आहेत. न्हावी समुदायाच्या नावाखाली ब्युटी पार्लरमध्ये काम केल्याने या मुसलमान तरुणांना महिलांशी जवळीक साधण्याची संधी मिळते आणि त्याचा ते पुरेपूर अपलाभ घेत आहेत.
‘पार्लर जिहाद’वर प्रसारमाध्यमांनी चर्चा चालू करावी !
हिंदु नेते दिनेश फलाहारी यांनी ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘पार्लर जिहाद’चे सूत्र केवळ धार्मिक नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेशी आणि सामाजिक रचनेच्या स्थिरतेशी संबंधित आहे. प्रसारमाध्यमांनी यावर देशव्यापी चर्चा चालू करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
संपादकीय भूमिकायावरून लव्ह जिहादी कुठल्याही कायद्यांना जुमानत नसल्याचे दिसून येते. ते वेगवेगळ्या क्लुप्त्या योजून हिंदु युवतींना फसवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद खर्या अर्थाने रोखायचा असेल, तर दोषींना आता फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करण्याविना पर्याय नाही, हे सरकार जाणावे ! |