कोरोना महामारीच्या कालावधीत तबलिगी नावाची मुसलमानांची जमात भारतात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याचे सर्वांच्या दृष्टीने उघड झाले होते. तेव्हा देशात सर्वांसाठी निर्बंध असतांनाही या जमातीचे लोक मात्र सर्वत्र वावरत होते. जमातीच्या ‘मरकज’ या कार्यक्रमात ते लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता पुन्हा या जमातीने राज्यात डोके वर काढले आहे. जमातच्या वतीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात खारघर (नवी मुंबई) येथे ‘इज्तेमा’चे (इस्लामिक सभेचे) आयोजन करण्यात आले होते. ‘या कार्यक्रमाला ३० सहस्र तबलिगी उपस्थित रहातील’, असे त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले होते; पण प्रत्यक्षात १ ते २ लाख मुसलमान तेथे कार्यक्रमासाठी आले. अल्प संख्या दाखवून गोड बोलून पोलिसांची सहजतेने अनुमती मिळवायची आणि नंतर सर्वाधिक शक्तीप्रदर्शन करत स्वतःचे रंग-रूप दाखवायचे, हे मुसलमानांचे षड्यंत्रच होते, हे आता उघड झाले आहे; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पोलिसांच्या ते लक्षातच येत नाही. लक्षात आले, तरी ते तसे दर्शवत नाहीत. मुसलमानांनी काहीही केले, तरी त्यांना मोकळीक द्यायची, हीच हिंदुविरोधी नीती ते प्रत्येक वेळी दामटवतात. ‘मुसलमानांना कुरवाळायचे आणि हिंदूंवर मात्र काठी उगारायची’, हे त्यांचे आता नित्याचेच झाले आहे. ३० सहस्र आकडा सांगून लाखोंच्या संख्येत मुसलमान आल्यानंतरही ना कार्यक्रमाच्या आयोजकांवर खोटे बोलण्याची तक्रार प्रविष्ट झाली, ना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. हे प्रकरण मिटल्यातोंडी ठेवण्याचा किंवा दाबून टाकण्याचाच सोयीस्कर प्रयत्न करण्यात आला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
इज्तेमानंतर लाखो मुसलमानांचा जमाव खारघर रेल्वेस्थानकात येऊन धडकला. जिकडे तिकडे मुसलमानच दिसत होते. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर ‘नवी मुंबई मुसलमानबहुल झाली कि काय ?’, असाच प्रश्न प्रत्येकाला पडला होता. या मुसलमानांनी प्रवाशांना धक्काबुक्की केली, आरडाओरडा करत लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ‘या सर्वांनी खरोखर तिकीट काढले होते का ? याचीही चौकशी व्हायला हवी’, अशी तेथील स्थानिक प्रवाशांनी मागणी केली. इतक्या मोठ्या संख्येत मुसलमानांनी एकत्र जमणे, हा एक प्रकारे हिंदूबहुल राज्यात दहशत माजवण्याचाच केलेला प्रयत्न होय ! ‘विकासाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अस्तित्वात येणार्या नवी मुंबईकरांसाठी मुसलमानांचे हे शक्तीप्रदर्शन, म्हणजे धोक्याची घंटाच आहे’, असे म्हणावे लागेल. नवी मुंबईतील हिंदू आता सुपात नव्हे, तर जात्यातच आले आहेत.
बरे, या सगळ्या प्रकाराला आवर घालताही आला असता. ‘तबलिगी जमातच्या इज्तिमासाठी दिलेली अनुमती तात्काळ रहित करून चौकशी करावी’, अशी मागणी ‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे संयोजक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डिसेंबर २०२४ मध्येच निवेदनाद्वारे केली होती. ‘अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक शांततेस धोका निर्माण होणार नाही’, याची काळजी घेतली जावी’, असेही त्या निवेदनात म्हटले होते; पण दुर्दैव, म्हणजे या निवेदनाची अपेक्षित प्रमाणात नोंद घेतली गेली नाही. जर या निवेदनानुसार कृती केली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला धार्मिक उन्माद घडलाच नसता. हिंदुत्वनिष्ठांच्या सूचनांना अशा प्रकारे केराची टोपली दाखवली जात असेल, तर तो एक प्रकारे अन्यायच आहे. हिंदूबहुल महाराष्ट्रात प्रत्येक वेळी हिंदूंची केली जाणारी उपेक्षा योग्य नाही, हे सरकार आणि प्रशासन यांनी जाणावे !
प्रशासनाला मुसलमानांचा उमाळा !
अनेक प्रवाशांनी या संपूर्ण प्रकारावरच टीका केली. त्यांचे म्हणणे असे की, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणातून मुंबईत परततात. रात्री-अपरात्री परतल्यावर १२ नंतर लोकल बंद असल्याने अनेकांना स्थानकातच थांबावे लागते. त्या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून मध्यरात्री लोकल सोडल्या जात नाहीत; पण या मुसलमानांच्या सुविधेसाठी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत अधिकच्या लोकल सोडण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने असा दुजाभाव का केला ? हा गणेशभक्तांवरील अन्याय नव्हे का ? ते सहिष्णु आहेत; म्हणून प्रत्येक वेळी त्यांनीच अन्याय सहन करायचा आणि असहिष्णु वृत्तीच्या लोकांसाठी मात्र पायघड्या अंथरायच्या ! ही कुठली लोकशाही आहे ?
तबलिगींकडून हिंदूंचे दमन !
हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर हा कार्यक्रम संपल्यावर याच तबलिगी जमातीच्या लोकांनी एका हिंदूची निर्घृण हत्या केली. खारघर येथून वाशी येथे घरी जाणारे रहिवासी शिवकुमार शर्मा यांच्या हातातील हिंदु धर्माशी निगडित असलेला टॅटू आणि गाडीवरील शंकराचे चित्र पाहून या मुसलमानांनी त्यांच्या डोक्यावर शिरस्त्राणाने पुष्कळ वार केले आणि त्यांची हत्या केली. पुन्हा एकदा हिंदूंवरच अन्याय झाला. याही प्रकरणात अद्याप ना कुणावर कारवाई झाली, ना कोणत्या धर्मांध मुसलमानाला अटक करण्यात आली. आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या काळात कोणत्याही प्रसारमाध्यमांपर्यंत हे वृत्त पोचले नसेल, असे होऊ शकत नाही; पण तरीसुद्धा ही घटना दाबली गेली. इज्तेमाच्या कार्यक्रमातून बाहेर पडून एखाद्याच्या खुनासारखे हिंसक कृत्य केले जाते, यावरून इज्तेमामध्ये हेच सांगितले जाते का ? असे असेल, तर अशा कार्यक्रमांवर बंदी का घातली जात नाही ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हायला हवे. या प्रकरणी ‘आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच इज्तेमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवावा, इज्तेमामधील सर्व भाषणांची सखोल चौकशी व्हावी’, या मागण्यांचे निवेदन विश्व हिंदु परिषदेच्या शिष्टमंडळाने खारघर (नवी मुंबई) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांना दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा आहे.
‘तबलिगी जमात’ला हद्दपार करा !
वर्ष २०२४ मध्ये मध्य आशियाई देश असलेल्या कझाकस्तानने देशात कट्टरतावादी विचारसरणी असलेल्या ‘तबलिगी जमात’वर कडक कारवाई केली होती. तिच्या अनेक प्रचारकांना अटक करण्यात आली. रस्त्यावर नमाजपठण करत वाहतूककोंडी झाल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली. कझाकस्तान हा मुसलमानबहुल देश असूनही तो तबलिगी प्रवृत्तीवर कारवाई करतो, मग धर्मनिरपेक्ष भारताला ते का बरे जमू शकत नाही ? यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभावच दिसून येतो. सातत्याने हिंदुविरोधी कृत्ये करणार्या ‘तबलिगी जमात’ला भारतातून कायमचे हद्दपार करण्यासाठी सरकार आणि प्रशासन या स्तरांवर प्रयत्न करणे कालसुसंगत ठरेल !
तबलिगी मुसलमानांचे दिसून आलेले लक्षावधींच्या संख्येतील शक्तीप्रदर्शन म्हणजे नवी मुंबईतील हिंदूंसाठी धोक्याची घंटाच होय ! |