|
मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात ‘नवदुर्गा तेजस्विनी’ ही विशेष मोहीम राबवली. या वेळी ११ सहस्र विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे. यात मध्य रेल्वेने ३३ लाख ९८ सहस्र ५०८ रुपये रक्कम दंड म्हणून वसूल केली. (दंडवसुलीसह अशा प्रवाशांना कठोर शिक्षाही करायला हवी ! – संपादक) यामध्ये तिकीट पडताळण्यासाठी महिलांचे नियोजन करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाएका महिन्यात एका राज्यात पकडण्यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! |