Ganesh mandap attacked by fanatics : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘अल्ला हू अकबर’च्‍या घोषणा देत धर्मांधांकडून गणेश मंडपावर आक्रमण !

  • हिंदूंना ‘पूजा बंद करा, अन्‍यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकी !

  • दोघा अल्‍पवयीन मुलांना अटक !

लक्षमणपूरी येथे श्री गणेश मंडपावर दगडफेकीनंतर चौकशी करतांना पोलीस

(‘अल्ला हू अकबर’ म्‍हणजे अल्ला महान आहे.)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’च्‍या घोषणा देत एका गणेश मंडपावर दगडफेक करून श्री गणेशमूर्तीजवळ ठेवलेले कलश फोडले. १० सप्‍टेंबर या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी  गंगा विहार कॉलनीतील छोट्या मशिदीजवळ रहाणारे किरण चौरसिया नावाच्‍या महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून २ अल्‍पवयीन मुलांना अटक केली आहे. (अल्‍पवयीन असतांना हिंदूंवर आक्रमण करणारे मुसलमान मोठे झाल्‍यावर जिहादी कृत्‍यच करणार ! – संपादक)

धर्मांधांकडून ‘पूजा बंद करा, अन्‍यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकी !

या तक्रारीमध्‍ये किरण चौरसिया यांनी म्‍हटले आहे, ‘‘प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी आम्‍ही श्री गणेशमूर्तीची विधिवत् स्‍थापना केली. दुसर्‍या दिवसापासून २०-२५ जणांच्‍या धर्मांधांच्‍या जमावाने आम्‍हाला त्रास देणे चालू केले. यामध्‍ये अल्‍पवयीन मुलांसह तरुणांचाही समावेश होता. आम्‍ही प्रतिदिन संध्‍याकाळी ७ ते ७:३० या वेळेत आरती करतो. आरतीच्‍या वेळी धर्मांधांचा जमाव ‘अल्ला हू अकबर’ आणि इतर अनेक प्रक्षोभक घोषणा देत गणेश मंडपासमोरून जाऊ लागला. पुढे गर्दीतील लोकांनी आरती करणार्‍या हिंदूंनाही धमकावले. प्रतिदिन जमावाकडून पूजेत बाधा आणण्‍याचा प्रयत्न केला जात होता. १० सप्‍टेंबरला सायंकाळी ७.३० वाजता आम्‍ही काही महिला आणि मुली आरती करत असतांना प्रतिदिनप्रमाणे काही धर्मांध मुसलमानंचा जमाव तेथे आला आणि त्‍याने आक्रमण करत मंडपात ठेवण्‍यात आलेल्‍या श्री गणेशमूर्तीची तोडफोड करण्‍याचा प्रयत्न केला, तसेच दगडफेकही केली. जमावाने येथील कलशाची मोडतोड केली. या वेळी धर्मांध मुसलमानांनी ‘पूजा बंद करा, अन्‍यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिली.’’

या घटनेनंतर किरण यांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार करत आरोपींवर कारवाई करण्‍याची मागणी केली.

हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून आंदोलन !

या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या कार्यकर्त्‍यांनी पोलीस ठाणे गाठून तेथे निदर्शने केली. यासह या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्‍याचीही मागणी केली. सध्‍या गणेश मंडपाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात मुसलमान बहुसंख्‍य असल्‍यामुळे, तर भारतात अल्‍पसंख्‍य असूनही संघटित असल्‍यामुळे प्रत्‍येक वेळी हिंदूंवर भारी पडतात आणि हिंदूंवर आक्रमणे करतात. याउलट हिंदू स्‍वतः विखुरलले असून त्‍यांना हिंदु नेत्‍यांकडूनही साथ मिळत नाही. हे चित्र हिंदूंना लज्‍जास्‍पद ! हिंदूंची ही दुःस्‍थिती पालटण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करा !
  • असे व्‍हायला लक्ष्मणपुरी भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? यावरून ‘उत्तरप्रदेशच्‍या राजधानीत हिंदूंची ही स्‍थिती असेल, तर खेडोपाड्यांतील हिंदूंची स्‍थिती कशी असेल ?’, हे लक्षात येते !
  • धर्मांधांवर पोलीस, प्रशासन, सरकार, न्‍यायालय आदी कुणाचाच धाक नसल्‍याने ते उघडपणे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात. सरकारने अशांच्‍या घरांवर तात्‍काळ बुलडोझर चालवण्‍याचे धाडस दाखवावे, असेच हिंदूंना वाटते !