मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे केंद्राकडून आदेश

मुंबई – मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागांना पाठवल्या आहेत. केंद्रातील रस्ते आणि वाहतूक महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी संबंधित विभागांना या सूचना पाठवल्या. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे चालू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी १६ पेक्षा अधिक घंटे लागतात. या संदर्भात खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदन दिले होते.