
‘साधक ‘आपण करत असलेला दैवी प्रवास सुखरूप आणि चांगला व्हावा’, यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेतील ऊर्जेच्या बळावर आणि त्यांच्या तळमळीच्या सेतूवरूनच आज आपण रामसेतूपर्यंत आलो आहोत. कलियुगात श्रीरामासमान रामराज्याची स्थापना करण्यास श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधक वानरसेनेच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’
‘हे श्रीरामा, ‘गुरूंच्या रामराज्य स्थापनेच्या (हिंदु राष्ट्राच्या) या ईश्वरी कार्यात आम्हा सर्व साधकांनाही खारीचा वाटा उचलता यावा आणि गुरुकृपायोगाच्या सेतूवरून मार्गक्रमण करून मोक्षप्राप्ती करून घेता यावी’, ही तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !