बेळगाव येथील श्री विठ्ठल भक्तांवर प्राणघातक आक्रमण

बेळगाव – मिरज तालुक्यातील मालगाव गावात बेळगावहून पंढरपूरला गेलेल्या श्री विठ्ठलाच्या ३ भक्तांवर मद्यधुंद व्यक्तींनी प्राणघातक आक्रमण केले. २० जुलै या दिवशी ही घटना घडली. सुरेश राजूकर, परशुराम जाधव आणि एक वाहनचालक यांच्यावर हे आक्रमण झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन करून बेळगावला परतत असतांना ते रस्ता चुकले.  ते बेळगावऐवजी मालगावला पोचले. तेव्हा त्यांच्या वाहनासमोर एक चारचाकी गाडी आली. या गाडीतील लोकांनी या तिघांशी वाद घातला आणि नंतर त्यांच्या साथीदारांना बोलावून मारहाण केली.