‘अहमदनगर’ जिल्ह्याच्या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

मुंबई – महाराष्ट्र शासनाने ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे केले आहे. या नामांतराला अर्शद शेख, पुष्कर सोहोनी आणि लखनौ विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. २५ जुलै या दिवशी यावर सुनावणी होणार आहे. १३ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ नामांतराला मान्यता दिली. त्याविषयी शासन आदेशही काढण्यात आला असून केंद्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.